🪷
*
जिल्हा प्रतिनिधी पुणे प्रवीण पप्पू शिंदे
संकलन दत्ता मोकाशी सर पिंपरी चिंचवड
तुमची स्वतःची ताकदच तुमचा काळ कशी ठरू शकते?जंगलातला शक्तिशाली प्राणी म्हणजे अस्वल. त्याच्या एका पंजाच्या फटक्यात समोरच्याचा जीव घेण्याची ताकद असते.पण तुम्हाला माहितीये का? याच अस्वलाचा जीव एका साध्या, निर्जीव लाकडाच्या ओंडक्याने घेतला. ज्या लाकडात ना जीव होता, ना हालचाल करण्याची शक्ती, त्याने अस्वलाची कवटी फोडली.
कसं शक्य आहे हे? चला, आज एका अशा मानसिक सापळ्याबद्दल बोलूया जो आपल्यापैकी अनेकांच्या आयुष्यात दररोज ‘अस्वल’ बनून आपल्याला छळत असतो
****
एका शिकाऱ्याने जंगलात एका झाडाखाली एक जड लाकडाचा ओंडा दोरीने टांगून ठेवला होता. तिथून एक काळं अस्वल जात होतं. चालताना ते लाकूड त्याला आडवं आलं. अस्वलाला राग आला. त्याने त्या लाकडाला हलकासा धक्का दिला.
दोरीला टांगलेलं ते लाकूड झोपाळ्यासारखं मागे गेलं आणि परत येताना अस्वलाच्या खांद्यावर आदळलं. आता मात्र अस्वलाचा पारा चढला. त्याने पूर्ण ताकदीने त्या लाकडावर वार केला.अस्वलाने जितक्या जोरात वार केला, तितक्याच उंचीवर ते लाकूड गेलं आणि दुप्पट वेगाने परत येऊन अस्वलाच्या तोंडावर आदळलं. वेदनेने अस्वल वेडं झालं.त्याला वाटलं समोरचा शत्रू खूप शक्तिशाली आहे. त्याने आपली संपूर्ण शक्ती एकवटली आणि त्या लाकडावर शेवटचा, सर्वात भयानक प्रहार केला.
आणि मग काय झालं? ते लाकूड सुसाट वेगाने परत आलं आणि थेट अस्वलाच्या डोक्यावर आदळलं. एका फटक्यात अस्वलाची कवटी फुटली.ते जागीच मेलं. मरतानाही त्या अस्वलाला हे समजलं नाही की, त्याला मारणारा कोणताही शत्रू नव्हता. ते फक्त एक लाकूड होतं, ज्याला अस्वलाने स्वतःच ताकद देऊन आपल्यासाठी जीवघेणं बनवलं होतं
****
मानसशास्त्रात यालाच ‘फिस्टिंजर्स लॉक’ (Festinger’s Lock) असं म्हणतात.नुकत्याच समोर आलेल्या काही अहवालांनुसार, फिस्टिंजर्सचे जुने शोधनिबंध पुन्हा उघडले गेले असून मानवी स्वभाव आणि प्रतिक्रिया यावर नव्याने संशोधन होत आहे.
आपल्या आयुष्यात घडणाऱ्या १० टक्के गोष्टी आपल्या हातात नसतात, पण उरलेल्या ९० टक्के गोष्टी आपण त्या १० टक्क्यांना कशी ‘प्रतिक्रिया’ (Reaction) देतो, यावर अवलंबून असतात.
****
रस्त्यावर गाडी चालवताना कुणीतरी कट मारला (१० टक्के घटना), तर आपण त्याला शिवी देतो किंवा त्याच्या मागे गाडी धावतो (९० टक्के प्रतिक्रिया).ऑफिसमध्ये बॉसने काहीतरी बोललं, की आपण दिवसभर चिडून राहतो आणि घरच्यांवर राग काढतो. *आपण अस्वलासारखे त्या परिस्थितीला जितक्या जोरात मारतो, तितक्याच जोरात ती परिस्थिती आपल्याला प्रतिप्रहार करते*.
****
आपण अनेकदा अशा वादात अडकतो जिथे समोरची व्यक्ती शांत असते, पण आपला अहंकार आणि राग आपल्याला त्या निर्जीव लाकडासारख्या परिस्थितीवर तुटून पडायला लावतो. आपण जितकी ताकद लावतो, तितकाच तो वाद मोठा होत जातो आणि शेवटी आपलंच नुकसान होतं.
मंडळी, विचार करा, तुमच्या आयुष्यात असं कोणतं *लाकूड*’ आहे ज्याला तुम्ही स्वतःच ताकद देऊन स्वतःसाठी धोकादायक बनवत आहात?
****
एखाद्या गोष्टीवर ताकदीने तुटून पडण्यापेक्षा, कधीकधी फक्त बाजूला होणं जास्त शहाणपणाचं असतं. कारण प्रत्येक वेळी समोरचा शत्रू नसतो, कधीकधी आपली प्रतिक्रियाच आपला सर्वात मोठा शत्रू असते.
तुमच्या आयुष्यात असं कधी घडलंय का, जिथे शांत राहिल्यामुळे मोठा अनर्थ टळला? की तुम्हीही त्या अस्वलासारखा प्रहार करत बसलात?




















